महाराष्ट्र

अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी ऍड. राजेश्वर चव्हाण तर उप सभापती लक्ष्मण करनर यांची निवड

अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष ऍड.राजेश्वर चव्हाण यांची तर उपसभापतीपदी लक्ष्मण करनर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


बीड जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागलेल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल ने घवघवीत यश संपादन करत 18 पैकी 15 जागेवर विजय मिळवला. त्यानंतर उत्पन्न बाजार समिती सभापती कोण विराजमान होणार तसेच आ. धनंजय मुंडे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सभापतीपदासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन दत्तात्रय पाटील यांचे नांव निश्चित झाल्याची चर्चा होती. संबंधित पॅनल प्रमुखांनी त्यांना तसे अश्वस्त ही केले केले असल्याची चर्चा होती. आज सभापती व उपसभापती पदांची उमेदवारी घोषित होईपर्यंत दतृता आंबा पाटील हेच सभापती होणार असे संकेत मिळत होते. मात्र सभापती निवडीसाठीची बैठक सुरू होताच ऐनवेळी ऍड. राजेश्वर चव्हाण यांचे नांव निश्चित झाल्याचा फतवा पक्षश्रेष्ठींनी पाठवला आणि सभापतीपदी ऍड. राजेश्वर चव्हाण यांचे तर उपसभापती पदी लक्ष्मण करनर यांचे नाव निश्चित होवून निवडणूक अधिकारी व्ही. एल. पोतंगले यांनी या दोघांची निवड जाहीर केली.


कृषी उत्पन्न बाजार सभापतीच्या सभापती पदी ऍड. राजेश्वर चव्हाण यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी चव्हाण यांचेकडुन काढुनी घेवून त्यांच्या जागी दत्तात्रय पाटील यांची निवड केली जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ऍड. राजेश्वर चव्हाण यांची सभापतीपदी निवड करुन विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी आपल्या जुन्या पट्टीवडगाव जि. पण. मतदार संघातील प्रबळ प्रतिस्पर्धी दुर केला असल्याची चर्चा होत आहे.
ऍड. राजेश्वर चव्हाण यांची अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी तथ उपसभापतीपदी लक्ष्मण करनर यांची निवड माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या शिफारशीनुसार करण्यात आली असल्याचे समजते. दरम्यान ऍड. राजेश्वर चव्हाण यांची सभापती पदी व लक्ष्मण करनर यांची उपसभापती निवड जाहीर होताच सर्वस्तरातून निवडीचे स्वागत होत आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker